naveerai.blogspot.com
नव्या पावलांनी । सजे पुन्हा भुई
भेटे नवी राई । नव्या जीवा
मनोगत
आतमधे मळभ असतंच. काहीतरी साचत असतं. रुजत असतं. उगवत असतं आतल्या आत.
पण अनेक पावसाळे भोगून झाल्यानंतर रुजण्या-उगवण्याचे, फुलण्या-गळण्याचे नावीन्य
ओसरते. नकळत एक तटस्थ अवस्था येते. किंवा मख्ख थकलेपण. पिकलेली फळं पडतात आतल्या
आत पण ती उचलून कुणाला द्यावी-दाखवाविशी वाटत नाहीत..!
पण अचानक मरगळ वितळते. चक्राकार गतीत फिरणार्या त्याच त्या घटनांमधे
ताजेपण जाणवतं. तो क्षण नवी राई भेटवणारा असतो. तिचं हिरवेपण लपेटून मळभही बोलू
लागतं... साचलेलं सगळं नव्या ऊर्जेसह उगवू लागतं कवितांमधून..
No comments:
Post a Comment