प्रत्ययांविषयी-
रोज सकाळी फिरताना
जवळ फोन असतो. नजरेला दिसत असतात असंख्य दृश्यं. त्यातलं एखादं दृश्य पाऊल पुढं
पडू देत नाही. कधी त्यातलं सौंदर्य मोहवतं तर कधी वेगळेपण.. मग ते टिपलं जातं. ही
निवड अगदी सहज आणि निर्हेतुक असते. आवडलेला फोटो मोबाइलचा वॉलपेपर बनतो. सुप्रभात
म्हणून कुणाकुणाला पाठवला जातो. फोटोखाली एकदा अभंग छंदात दोन ओळी लिहिल्या
गेल्या. छान वाटलं. प्रतिसादही छान मिळाला. मग हा छंद अभिव्यक्तीची शैली म्हणून
मनात रुजू झाला.
या ओळी सुचणं
म्हणजे एका परीनं तो फोटो समजणं... किंवा फोटोच्या माध्यमातून आतलं आकलन स्पष्ट
होणं.... काही ओळींमधे निखळ सौंदर्याचा आस्वाद घेतला गेला आहे. काहींमधे काहीसं
तत्त्वचिंतन जाणवू शकेल. तर काहीत सामाजिक स्थितीची बोच व्यक्त झालीय... फोटो
पाहून प्रत्येकाला वेगळा प्रत्यय येऊ शकेल. ‘प्रत्ययाचे बिंब’ नावानं मला आलेले प्रत्यय इथे शेअर करतेय...
No comments:
Post a Comment